Skip to main content

समाजसुधारक आणि त्यांच्याबद्दलची अपरिचित माहिती


महात्मा जोतीराव फुले
जोतीराव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे 11 एप्रिल 1827 रोजी झाला.आईचे नाव चिमनाबाई होते.
मूळ आडनाव गोरे होते,पण पुण्यात आल्यानंतर फुलांचा व्यवसाय करीत असल्याने फुले झाले.
जोतिबांचे शिक्षण स्कॉटिश मिशनरी शाळेत झाले. जोतिबांच्या वडील गोविंदराव यांनी काही कारणास्तव जोतिबांना शाळेतून काढले होते.परंतु, गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट यांच्या आग्रहामुळे पुन्हा शाळेत घातले.

प्रभाव
जोतिबांवर  छ. शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चारित्रांचा तसेच थॉमस पेन यांच्या द राइट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव होता.

शैक्षणिक कार्य
3 ऑगस्ट1848 पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.4 मार्च 1851 पुणे येथील बुधवार पेठेत चिपळूणकर वाड्यात दुसरी शाळा सुरू केली.1852 ला अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली.10 सप्टेंबर 1853 महार,मांग इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी संस्था स्थापन केली.1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाला सुरू केली.1877 दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प सुरू केला.
1882-हंटर कमिशन समोर साक्ष दिली.
फुलेंनी शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटले आहे.
शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला विरोध केला होता. पुण्यात श्री.शिवाजी मराठा सोसायटी ची स्थापना केली.1852-पूना लायब्ररी ची स्थापना. फुलेंनी एकूण17 शाळा स्थापन केल्या होत्या.
शाळांना दक्षिणा फंडातून महिन्याला 25रु मदत मिळायची.

मित्र
सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे

शाळेत शिक्षक म्हणून कार्य करणारे सहकारी
सावित्रीबाई फुले, फातिमा शेख,विष्णूपंत थत्ते, वामनराव खादाडकर, विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघो सुखराम, धुराजी आप्पाजी चांभार, केसो त्र्यंबक, विठोजी बापूजी,विनायक गुणेश, धोंडो सदाशिव, गुनू राझुजी, ग्यानू शिऊजी व गनू शिवाजी मांग

सत्यशोधक समाज
24 सप्टेंबर 1873
ब्रीदवाक्य-सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी

शेतकऱ्यांसाठी कार्य
शेतकऱ्यांसाठी त्यांनी शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे,तलाव,विहिरी यांसारखे उपाय सुचवले.1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्यांचे प्रतिनिधी' म्हणून पारंपरिक पोषाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण यावरही विचार मांडलेत.पुण्याजवळील मांजरी येथे त्यांनी चांगल्या प्रकारे शेती करून दाखवली.

स्त्री व बालके यांच्याकरिता कार्य
1863 बालहत्या प्रतिबंधक गृह
व्हिक्टोरिया अनाथाश्रमाची स्थापना
1864-पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.रघुनाथ जनार्दन व नर्मदा यांचा पुनर्विवाह.
ब्राम्हण विधवेच्या यशवंत या मुलास दत्तक घेतले.

कामगार विषयक कार्य
1879-फुले यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची 'मुंबई मजूर संघ' ही संघटना स्थापन केली.
1884नारायण मेघाजी लोखंडे यांनी फुलेंच्या प्रेरणेतून 'बॉम्बे मिल हँडस असोसिएशन' सुरू केली.

ग्रंथसंपदा
1868-ब्राम्हणांचे कसब
1873-गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो लोकांना समर्पित केला.
1873-अस्पृश्यता निवारणाचा पहिला जाहीरनामा प्रकाशित
1883-शेतकऱ्याचा आसूड
1885-इशारा
1887-सत्यशोधक समजोक्त मंगलाष्टके विधी
1869-शिवाजी महाराजांचा पोवाडा
1883-अस्पृश्यांची कैफियत
1890-सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला.यालाच विश्वकुटुंबवादाचा जाहीरनामा म्हणतात.

नाटक
1855-तृतीय रत्न

ऐतिहासिक कार्य
1868-स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांकरिता खुला केला.
1869-शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला.
1874-पुण्यात हिराबागेत शिवजयंती उत्सव सुरुवात केली. याप्रसंगी गंगाराम भाऊ म्हस्के व हरि रावजी चिपळूणकर यांनी मदत केली.

सत्कार व पदवी
1852-पुण्यात विश्रामबाग वाड्यात मेजर कँडी च्या हस्ते सत्कार झाला.
11मे 1888-मुंबईत विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांच्या हस्ते'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
फुले यांनी पुणे महानगरपालिका सदस्य म्हणून1878 ते 1882 पर्यंत कार्य केले.

अनिष्ट प्रथांना पायबंद
वाघ्या मुरळी प्रथेला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला.
जरठ विवाहाला विरोध केला.

व्यवसाय व महत्वाची कामे
जोतीराव हे व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर होते.सहकाऱ्यांसोबत 'पुणे कॉमर्शिअल अँड काँट्रॅकटिंग कंपनी' स्थापन केली.
खडकवासला धरणातून शेतीकरिता कॅनॉल बांधले. आज आपण कात्रजचा जो घाट बघतो त्याच्याही बांधकामाला चुना व इतर साहित्य तसेच मजुरांचा पुरवठा केला. जातीभेद निवरणाकरिता मजुरांसोबत एकत्र जेवणाची पद्धत सुरू केली.पुण्यात मंडई ची गॉथिक शैलीतील इमारत उभारली. सुरुवातीला या मंडई चे नाव 'रे मार्केट' असे होते. आचार्य अत्रे पुणे महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष जेव्हा होते तेव्हा त्यांनी या मंडई चे नामकरण 'महात्मा फुले मंडई' असे केले. पुण्यात प्रवेश करताना बंडगार्डन  पूल पार करून यावे लागते. हा पूल देखील फुलेंनी बांधला आहे.येरवडा तुरुंग उभारणीच्या कामातही फुलेंनी सहाय्य केले आहे.'दलित' हा शब्दप्रयोग सर्वप्रथम फुलेंनी केला.1970 च्या काळात दलित पँथर ने हा शब्द लोकप्रिय केला.

फुलेंच्या कार्याचा प्रभाव असणारी व्यक्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छ. शाहू महाराज,प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील,लोकहीतवादी गोपाळ हरी देशमुख , लाल शंकर, उमा शंकर ,न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.
लाल शंकर यांनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

महात्मा फुले यांच्याबद्दल गौरवोद्गार
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे छ. शाहू महाराज म्हणाले होते. दलितोधारक असे वि. रा.शिंदे म्हणाले होते. हिंदुस्थानचा वॉशिंग्टन ही पदवी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिली होती.

Comments

Popular posts from this blog

कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे

आद्य कामगार चळवळीचे जनक डॉ. ना. म. लोखंडे यांचा जन्म ठाणे येथे गरीब माळी कुटुंबात झाला.त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाणे येथे झाले. नंतर ते मुंबईस भायखळा येथे राहिले. रेल्वे, पोस्ट खात्यात भांडारपाल म्हणून नोकऱ्या केल्या. सत्यशोधक निबंधमाला, पंचदर्शन या पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या. 1880 ते 1897 या काळात दीनबंधूचे संपादक असताना शेतकरी विशेषत: कामगारांची बाजू मांडली. 1884 मध्ये मुंबई सरकारने जे फॅक्टरी कमिशन नेमले होते त्या कमिशनने कामगारांची कैफियत ऐकावी, अशी मागणी त्यांनी केली! शूद्रातिशूद्राला शिक्षणासाठी मराठा ऐकेच्छु सभा, कष्टकऱ्यांच्या आरोग्यासाठी मराठा प्रोव्हिडंट हॉस्पिटल या संस्था त्यांनी उभारल्या. केशवपन बंद व्हावे म्हणून लोखंडे यांनी मुंबईत न्हाव्यांचा संप घडवून आणला. 1893 च्या मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगलीच्या वेळी दंगलग्रस्तांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले. 1896-97 च्या मुंबईतील प्लेगच्या साथीत रोग्याची ने-आण व देखभाल करण्याचे काम करतानाच लोखंडे यांना 1897 साली मृत्यू आला.

डॉ. विश्राम रामजी घोले

डॉ .  विश्राम रामजी घोले त्यांचा जन्म खाटीक गवळी जातीत झाला. विविध नोकऱ्या करून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 1852 ला शासकीय हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन, पुढे आर्मी मेडिकल ऑफिसर, सिव्हील सर्जन, व्हॉईसरॉयचे ऑनररी सर्जन, फिजिशियन म्हणूनही त्यांनी काम केले. शस्त्रक्रियेत ते अत्यंत निष्णात होते. पुणे शहरातील पार्शी, युरोपियन व ब्राह्मणांचा त्यांच्या उपचारावर विश्वास होता. घोले यांना ब्रिटिश सरकारने 'रावसाहेब', 'रावबहादूर' या सन्मानदर्शक पदव्या दिल्या होत्या.1875 ला सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ झाला तेव्हा ज्योतिबांनी डॉ. घोले यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले.सत्यशोधक समाजाच्या शैक्षणिक प्रकल्पास त्यांनी आर्थिक साहाय्य केले. ओतूर येथे ब्राह्मणांच्या मध्यस्थीशिवाय जे विवाह झाले तेव्हा कोर्टात ते अशा विवाहांच्या बाजूने उभे राहिले. घोले यांनी फुले यांच्या 'सार्वजनिक सत्यधर्म' पुस्तकाच्या मराठी आवृत्तीस अभिप्राय लिहिला. फुलेंच्या पक्षघात वर उपचार घोले यांनी केले.

अखेर तुकडेबंदी रद्दचा अध्यादेश निघाला....

 बहुचर्चित विषय, अनेक वर्षांपासून रेंगाळलेला होत. अखेर 2 नोव्हेंबर रोजी मा. राज्यपाल महोदयांनी यावर या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. पार्श्वभूमी: २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात नामदार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन तुकडेबंदी रद्द करण्यात येईल, अशी घोषणा सभागृहाच्या पटलावर केली होती.  त्यात साधारणतः १५ दिवसात एक समिती कार्यपद्धती जाहीर करेल, असे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात अध्यादेश काढण्यासाठी २ नोव्हेंबर उजाडला. असो, सरकारी काम अन् महिने थांब... अध्यादेश आलाय, पण पुढे काय? १ गुंठा खरेदी विक्री कधी सुरू होणार? मंत्री म्हणालेत की महसूल विभाग एक नियमावली, आदेश जारी करणार आहे. त्यात कशा पद्धतीने १ गुंठा जमिनीची खरेदी विक्री करता येईल, याविषयी माहिती असेल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने तुकडेबंदी रद्द झाली असे म्हणता येईल. *तुकडेबंदी म्हणजे काय? कायद्याचं खरं नाव काय आहे? कोणासाठी लागू होतो?    महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारत देशात जमिनीची मूळ उद्देश हा शेती करणे हा होता. त्यातून अन्नधान्य पिकवून दैनंदिन गरज भागवणे असा होता. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहे...